वसा समाजसेवेचा !!
१८
ते २० उंबऱ्यांचे एक गाव ,वास्तविकता
लक्षात घेतली तर त्याला गाव म्हणता येणार नाही, वनहाटी एक आदिवासी पाडा. पाड्याची लोकसंख्या जेमतेम
१०० ते १२०. हा आदिवासी पाडा मावळ
तालुक्यात लोणावळ्याच्या थोडे पलीकडे असलेल्या राजमाची किल्ल्यानजीकच्या डोंगराळ
भागात वसलेला आहे. या पाड्यातील लोकांचा उपजीविकेचा मुख्य असा कोणता स्त्रोत नाही.
ज्या धरणाच्या कामासाठी हा पाडा स्थलांतरित झाला त्याच धरणात मासेमारी करायची,
खेकडे पकडून विकायचे हेच काय ते यांचे मुख्य काम तेही पावसाळ्याचे चार महिने. हा
भौगोलिकरित्या दुर्गम असल्याने येथे तितक्याशा रोजगाराच्या संधीही उपलब्ध नाहीत.
प्रसंगी ओझी वाहायचे , बिगारी करायचे काम या लोकांना करावे लागते. खरे सांगायचे
झाले तर या गावात वीजच काही महिने पूर्वी दाखल झाली. कित्येक वर्षे हा पाडा तसा
अंधारातच होता. काही सामाजिक संस्थांच्या वतीने झालेल्या मदतीत या पाड्याला काही
सौर दिवे देण्यात आले . सकाळी खायला मिळाले तर रात्री मिळेल काय ? अशी परिस्थिती
आजही इथे पाहायला मिळते. इथल्या रहिवाशांची प्रमुख अडचण ही शिक्षण आहे आणि त्याचबरोबर उदरनिर्वाहाचे साधन.

यंदाचा प्रजासत्ताक दिन हा
प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यासाठी नक्कीच खास होता. या कार्यक्रमाला सदस्यांनी
मोठया प्रमाणावर आपला सहभाग दर्शवला. आपण रहात असलेल्या समाजाचे आपण कुठेतरी देणेकरी लागतो , त्यासाठी आपण काहीतरी
नक्कीच करायला हवे ही भावना सगळ्यांच्याच मनात पुन्हा एकदा उद्दीपित झाली.



Comments
Post a Comment